१९७१ च्या युद्धाशी तुलना नको : थरुर   

शस्त्रसंधीचे स्वागत, शांततेसाठी आवश्यक

नवी दिल्ली : पाकिस्तानविरोधातील १९७१ च्या युद्धातील विजय मोठा होता. त्या विजयाच्या शिल्पकार माजी पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. त्याचा मला अभिमान आहे. मात्र, त्याची तुलना सध्याच्या ऑपरेशन सिंदूरशी करु नका, असे काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी म्हटले आहे. इंदिरा गांधीच्या नेतृत्वाखाली भारताने बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याची तुलना ऑपरेशन सिंदूरशी, शस्त्रसंधीशी करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर टीका केली जात आहे. त्या बद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. दोन्ही घटनांची तुलना करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. १९७१ आणि २०२५ मधील परिस्थितीत मोठा फरक आहे. सध्याच्या काळात शांततेसाठी शस्त्रसंधी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

Related Articles